बुधवार, २४ डिसेंबर, २००८

चितेवरची फूले


चितेवरची फूले
सजुदे माझी पालखी
अंतिम क्रियेच्या दिवशी
मरनानेही घात करावा
पौर्णिमेच्या दिवशी
त्या एकट्या चंद्राची
सोबत फक्त असावी
अन लक्ष तारकांची
उधलन फुलात असावी
चन्द्र तारे साक्षीने
चिता माझी पेटावी
जललेल्या त्या लाकडान्चि
राख हवेत मिसलावी
हवेलाही मग
त्या राखेचा गंध यावा
जीवनालाही परत येण्याचा
एक नविन छंद मिळावा
manali sawant

शब्द


शबद
शब्दांच्या गावी जायचे मला
शब्द शब्दच जिथे शब्द ही अपुरे पडतात
शब्दांच्या वाटेलाच शब्दच दिवा दाखवतात
शब्दांच्या नावेत शब्दांची होडी
शब्दांच्या जिभेला शब्दांची गोडी
शब्दांच्या अंगणात शब्दांचीच फूले फुलतात
शब्दांच्या झाडाला शब्दाचेच झूले झुलतात
शब्दाच्या लढाइत् शब्दच मरून पडतात
शब्दाच्या मेह्न्दित शब्दच रंगतात
भावः ,भावना प्रेम यांचे सुरेख बंध असतात
शब्दांच्या ओंझालित शब्दच रमतात
शब्द कधी गोड , मधाल ,मनोरंजन करतात
शब्द कधी तिखट कडू जिभेला झोम्बतात
manali sawant

गुरुवार, ११ डिसेंबर, २००८

majhe ashru


majhe ashru
अश्रु डोळ्यातले डोळ्यातच कसे साठवायचे
डोळ्याच्या काठानी आणखी किती भार पेलायचे
तू नसतोस तेव्हा अश्रु डोळ्यानाच जड़ होतात
आठवनी तुझ्या मनास मोहरून जातात
गोष्ट एक क्षणाची क्षणातच कशी ठेवायची
गोष्ट अशी की शब्दातच कशी साठवयची
तू माझा नाहि हे सत्यच कडू आहे
तुझ्या मार्गातुन जाने हेच पटत आहे
तुझ्या आठवनी व अश्रु हेच सोबत आहेत
आणि न कळत अश्रु ओघलत आहेत
manali

संस्कृति


संस्कृति
संस्कृति शेवटी संस्कृति म्हणजे बाजरीची भाकरी ,वांग्याचे भरित "गणपती बाप्पा मोरयाची"मुक्त आरोळी, केलीच्या पानातील भाताची मुद आणि त्यावरचे वरण,उघड्या पायानी तुडावलेल्या गंगेचा काठ . मारुतीच्या देवलात शनिवारी एका दमात फोडलेल्या नारलातले उडालेले पाणी दुसरयाना पाय चुकून लागल्यावर देखिल आपण प्रथम केलेला नमस्कार -दिव्या दिव्या दिपत्कार,आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी मारुतीची न जळनारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी -दसर्याला वाटायची आपट्याची पाने -पंडरपुरचे धुल आणि अबीर यांच्या सम प्रमाणात मिसलून खालेले डाले आणि साखर फुटाने -सिंह गडावर भरून आलेली छाती आणि दिग्वंत आप्तांच्या मुठभर अस्थिचा गंगा पर्नाच्या वेळी झालेला स्पर्श -कुभातल्या चाकावर फिरनार्या गोळ्याला त्याचे पाण्याचे भिजलेले नाजुक हाथ लागुन धारधार मडके घडावे तसा ह्या अदृश्य पण भावनाने भिजलेल्या हातानी हा पिंड घडत असतो कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कप -बशिचा

tu mi


tu mi
सर्वाना आपलस करताना
कुणीच नाहि झाल माझ
नात्याच्या या गुन्त्यामध्ये
जीवनच झालय ओझ
अलीकडे तुझ्या वागण्यात
कितीरे बदल झालाय
हातात मोगरा असतानाही
तुला रातराणीचा गंध हवाय
किती वाट पहायची मी
यायला तू उशीर केलास
घरटयातला पक्षी आता
घरट सोडून उडून गेलाय
तुझ्या माझ्या ह्र्द्याच नात
जन्मोजन्मीच असाव
हातात हात घेताना माझा
तू डोळ्यात पाहून हसाव
कितीही संकटे आली तरी
तुझ हात हातात असावा
आणि मुत्युला जवळ करतानाही
देह तुझ्याच मिठीत असावा

lagna



lagna
भरजरीचा शालू नेसून
आले मी माडवात
सप्तपदी जवळ येताच
हात दिला हातात
पुष्प अक्षता सह
मंगल अष्टकांची साथ
आयुश्याच्या नव्या पर्वाला
आता येथून सुरवात
मंगलाष्टक संपली सुरु झाला
सोहला अहेरांचा
मामा - मामी ,आजी -आजोबा
मित्र परिवार हजर
आहेतच वरातिला
आई -वडिलांच्या डोळ्यात
आनद अश्रु उभे होते
त्याना बघून आता मलाही
रडू फुटत होते .................
manali sawant

मंगळवार, २ डिसेंबर, २००८

prem ki maitri ??????????

prem ki maitri ??????????

नकळत या पाशात का अडकत आहे
का असे कुणावर हे मन जड़त आहे

न रहवुनी ही सतत आठवण त्याची होते
पण भेटल्यावर मात्र नि :शब्द होउन बसते

खुप विचार करते हे नेमक काय घडत आहे
प्रेम की मैत्री नाहि उमजत आहे

हलू हलू मन फ़क्त त्याच्याताच गुंतत आहे
स्वप्न ही फ़क्त त्याच्याच करता जागत आहे

हलकेच मग निद्रेचा असा काही धुंद चढतो
मग स्वप्नानाही त्याच्याच गावचा रस्ता दिसतो

manali.d.sawant

प्रेम म्हणजे !!

प्रेम म्हणजे !!

प्रेम म्हणजे सुंगंध , कस्तूरी हुनी श्रेष्ट .
प्रेम म्हणजे काठिन्य , लोखंडा हुनी अभंग .
प्रेम म्हणजे संगीत , ताला-सुराचे नाहि बंधन .
प्रेम म्हणजे समुद्र , भरती - अहोटिचा खेळ .
प्रेम म्हणजे शब्द , मुक्याचे ते बोल .
प्रेम म्हणजे गोडवा , अमृता हुनी गोड़ .
प्रेम म्हणजे दगड , सदैव अटल .
प्रेम म्हणजे मिलन , दीप-पतंगाची प्रीत .
प्रेम म्हणजे मैत्री , नात टिकवनारी .
प्रेम म्हणजे गोष्ट , कधीही न संपणारी ..............!!

मनाली .दि. सावंत ,

रविवार, ३० नोव्हेंबर, २००८

आठवतेय का तुला !!


आठवतेय का तुला !!


आठवतेय का तुला

आपली ती पहिली भेट

लपून छापून होणारी

अपुली गला भेट !


आठवते का तुला

पहिला बघितलेला सिनेमा

भीती वाटते म्हणुन

हळूच डोळे झाकनारा !


आठवतेय का तुला

पहिल घेतलेल शहाल

दोन stro घालून

आपल ते पीण !


आठवतेय का तुला

ती सौम्य सन्ध्याकाल

हातात हात घालून

आपल डोळ्यात बघन !


आठवतेय का तुला

वाट माझी पाहन

उशिरा आलो म्हणुन

नाटकी तुझ रुसन !


विसरु नको अस पटकन

आपल लग्न झाल तरीही

मूलं प्रमाने मलाही वेळ दे

वय आपल सरतय तरीही !!!!!!


...............मनाली सावंत

kuni tari asav

kuni tari asav

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं

हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं

कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं

काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं

आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं

कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं

दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहनारण

फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं

कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं

सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं

थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं

कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं

माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं

एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

manali sawant